पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा, म्हणाल्या ’26 जानेवारीपासून मी…’

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. 26 जानवारीपासून त्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. गेल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर कमबॅक करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

पंकजा मुंडेंनी ओबीसी आरक्षण स्थगित झाल्याच्या निर्णयावर पुन्हा भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे. आत्ताच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत त्यामुळे, ही महाराष्ट्रातील काळी निवडणूक आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणासह मराठा आरक्षणाबद्दलचाही डाटा राज्य सरकारनं दिला पाहिजे. आष्टी येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

राज्य सरकारनं मागच्या काही दिवसांत वेळ घालवला. आतापर्यंत काम केलं असतं तर अशी वेळ आली नसती. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होत आहेत. हा ओबीसींवर अन्याय आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

एक तर डाटा गोळा करायला हवा होता, अन्यथा निवडणुका डाटा मिळेपर्यंत पुढे ढकलायला हव्या होत्या. असं काहीही सरकारनं केलं नाही. त्यामुळे आता होणारी ही निवडणूक काळी निवडणूक असल्याचं त्या म्हणाल्या.

बीड जिल्ह्याचे रस्ते बघता बघता मला मणक्याचा आजार झाला. मी पालमंत्री असताना कोट्यवधींचा निधी दिला, मात्र दोन वर्षात काहीही निधी नाही, असं सांगत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, राज्यात आघाडीचे सरकार असले तरी राज्यात केंद्र निधी द्यायला कमी पडणार नाही, असेही त्या म्हणाल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेतेही या निवडणुकीत पूर्ण जोमाने उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

माझा तर काय नेमच नव्हता, कोणाला वाटत नव्हतं मी निवडून येईल पण…- धनंजय मुंडे

“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही” 

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक झटका 

‘बंगळुरूतील त्या समाजकंटकांना शोधून काढा’; अजित पवारांचा कर्नाटकला इशारा 

‘…तसं महाराष्ट्रात पुन्हा झाल्यास सोडायचं नाही’; राज ठाकरेंचा इशारा