ठरवलं तर पाकिस्तानला फक्त 10 दिवसांत धूळ चारू- मोदी

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनसीसी नॅशनल कॅडेट्सना संबोधित केलं. यावेळी आपण जर ठरवलं तर पाकिस्तानला फक्त 10 दिवसांत धूळ चारू, असं वक्तव्य मोदींनी केलं. तीन तीन वेळा आपण त्यांना हरवलंय हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानचं नाव न घेता पाकिस्तानला लक्ष्य केलं.

भारतीय लष्कराला वाटलं तर आठवड्यात किंवा दहा दिवसात ते पाकिस्तानला धूळ चारतील, असं मोदी म्हणाले. पाकिस्तान अनेक दिवसांपासून भारताविरोधात छुपे युद्ध करत आहे. यात अनेक नागरिकांना आणि सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे, असं मोदी म्हणाले.

मोदी आपल्या प्रतिष्ठेसाठी जन्माला आला नाही. मोदीसाठी देशाची प्रतिष्ठाच सर्वकाही आहे. अनेक दशकांपासून ज्या समस्या आहेत त्यावर आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय तर विरोधक आम्हाला सांप्रादायिक ठरवत आहेत, असं म्हणत मोदींनी विरोधी पक्षांवर टीका केली.

दरम्यान, याच भाषणात मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख केला. काँग्रेस दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम करत होतं पण आम्ही सर्जिकल स्ट्राईक करण्याची लष्कराला परवानगी दिली, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

सत्ता असताना गोट्या खेळत होता का?? जलीलांचा पंकजांना सवाल

-सरकार बरखास्त होईल अशी धमकी देणाऱ्या मुनगंटीवारांना थोरातांचं सडेतोड प्रत्युत्तर!

-राज ठाकरेंची कोलांटीउडी…. आता म्हणतात ‘माझा CAA ला पाठिंबा नाही’!

-“ज्यांची चौकशी करायचीये त्यांची लवकर करा… तुमचं सरकार कमी काळाचं आहे”

-नवाब मलिकांचं मुनगंटीवारांना खुलं आव्हान!