“दिल्लीतील दंगलीमागे RSS आणि भाजपचा हात”

पंढरपुर | दिल्लीत झालेल्या दंगलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा हात आहे, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर आज पंढरपुरमध्ये राष्ट्रीय संत सेना महाराजांच्या जयंतीनिमित्त आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

सीएए, एनआरसी आणि एनपीआर च्या विरोधात दिल्लीतील शाहीनबागेमध्ये आंदोलन सुरु होतंं. त्या आंदोलनाला हिंसक स्वरुप प्रात होऊन दंगली उसळल्या होत्या. यावरून प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि संघावर निशाणा साधला आहे.

दरम्यान ही दंगल पुर्वनियोजित होती आणि पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य मानू नका. तसेच या दंगलीचा कट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने रचला होता, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

‘उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा नाटक’; निलेश राणेंची बोचरी टीका

मुख्यमंत्री होईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं-उद्धव ठाकरे

मी भाजपला सोडलंय… हिंदुत्वाला नाही- उद्धव ठाकरे

-शिवसेनेच्या वतीने राम मंदिरासाठी 1 कोटी रूपये देणार- उद्धव ठाकरे

-आमची छाती जरी फाडली तरी रामच दिसेल- चंद्रकांत पाटील