पुणे : काल झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये याकरिता शाळांना आणि महाविद्यालयांनी सुट्टी घोषित करण्यात आली आहेे.
पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये यांना गुरुवारी दि. 26 सप्टेंबर, 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.
सळधार पावसामुळे शहरातील सर्वच भागातील रस्ते जलमय झाले. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
रस्त्यावरच्या पाण्यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या आहेत. महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
नागरिकांनी काळजी करु नये आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कुणाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असं आवाहन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे.
सलग आठव्या वर्षी मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय! – https://t.co/ZH5DQGIMNp #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 25, 2019
“उदयनराजेंविरोधात लढलो मग पवारांना तरी का सोडू???”- https://t.co/oZp1Q6IGh7 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 25, 2019
शरद पवारांवर झालेल्या ईडीच्या कारवाईवर रावसाहेब दानवे म्हणतात…- https://t.co/TvHgsGdOwA #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 25, 2019