पुणे | केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींच्या पुणे दौरा चांगलाच गाजताना दिसत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसच्या महिला आघाडीनं पुण्यात जोरदार आंदोलन केलं.
आंदोलन करत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर आता प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
स्मृती ईराणींचा बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम चालू असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोले लगावले आहेत. परिणामी वाद वाढण्याची शक्यता आहे.
हे सगळे विकृत लोक आहेत. देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्यांचं त्यांना कळतं का?, असा सवाल रूपाली पाटील यांनी फडणवीसांना केला आहे.
स्वत:च्या बायकोला लोक बोलली तर इतरांना पुढं करता का?, इतरांच्या महिलांना मारहाण होते तेव्हा काय?, असा सवाल करत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आता गुन्हा दाखल झालाय आता कारवाई करा, अटक करा. आता लढाई सुरू झाली आहे. करारा जवाब मिळेल, असं वक्तव्य देखील पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, स्मृती ईराणींच्या पुणे दौऱ्यावेळी मोठा गोंधळ झाल्यानं भाजप पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांवर पक्षाची नाराजी असल्याची चर्चा देखील होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“कारवाई न झाल्यास जशास तसं उत्तर देऊ”; देवेंद्र फडणवीस आक्रमक
“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही”
“कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल
“मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”
Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज