Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जगभरात सुरु असलेल्या कोरोना महामारीचा उल्लेख केला.

या अर्थसंकल्पातून भातालार पुढील 25 वर्षांचा पाया मिळेल, असं अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 9.2% राहण्याची अपेक्षा आहे. देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरतेय, असं त्यांनी सांगितलं.

आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं त्या म्हणाल्या. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटलं.

या बजेटमध्ये पुढच्या 25 वर्षांची ब्लू प्रिंट असणार आहे असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार आहोत. पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी रुपये देणार आहोत, असं त्यांनी म्हटलं.

अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी सांगितलं की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये पुढील 25 वर्षाची ब्ल्यू प्रिंट असेल. देशात आर्थिक रिकव्हरीला बळकट करण्यावर फोकस केला जाणार आहे, असंही त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

Budget 2022 | देशाची अर्थव्यवस्था सावरतेय, सामान्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न- निर्मला सितारमण 

सर्वसामान्यांना बसू शकतो सर्वात मोठा झटका; ‘या’ गोष्टी महागणार? 

‘…त्यामुळे आम्ही जनावरांसारखे बनतो’; शोएब अख्तरचं खळबळजनक वक्तव्य 

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना चिथावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊला पोलिसांकडून अटक 

राज्यातील निर्बंधांबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, आता…