मोठी बातमी! संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई | राज्यात तपास यंत्रणांच्या सुरू असलेल्या कारावायांवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राऊतांनी सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे (bjp) एक प्रमुख नेते व केंद्रीय तपास यंत्रणांचे एक-दोन बडे अधिकारी मिळून महाराष्ट्रातला खेळ खेळत आहेत. राजकीय विरोधकांवर कशी व कधी कारवाई करायची, त्याआधी बदनामीची मोहीम राबवायची, असं राऊत म्हणाले.

भाजपशी संबंधित एक-दोन लोकांनी अशा कारवाईसंदर्भात सोशल मीडियावर सूतोवाच करून धमकवायचे हा प्रकार मोदी यांची प्रतिष्ठा पंतप्रधान म्हणून धुळीस मिळवणारा आहे, अशी टीका संजय राऊतांनी केला आहे.

आम्हाला सक्षम आणि मजबूत विरोधी पक्ष हवा आहे, पण आमच्या हातात काय आहे? हे जनतेने ठरवायला हवं, असं वक्तव्य अमित शहा यांनी राज्यसभेत केलं आहे. शहा यांचं बोलणं तर्कसंगत आहे. पण केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून आजचे सत्ताधारी आधीच दुर्बल असलेल्या विरोधी पक्षाचे हात-पाय छाटणार असतील तर काय करायचं, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपचे महात्मा किरीट सोमय्या हे इतरांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज आपटतात. ईडी व सीबीआयची धमकी देतात. पण विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी त्यांनी लोकांकडून प्रचंड पैसा गोळा केला. त्या पैशांचा अपहार करून लोकांना आणि देशाला फसवलं. त्या फसवणुकीसंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना स्वतःच पुढे येऊन या प्रकरणाचा तपास करावा असे का वाटत नाही?, असा सवालही संजय राऊतांनी ईडीला विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अनिल देशमुखांना सर्वात मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश 

‘ग्रुप SEX करण्यास नकार दिल्याने…’; 19 वर्षीय विद्यार्थिनीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार 

“हल्ला करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता, मग…” 

“आज झुकला तर पुन्हा भगव्याचं दर्शन होणार नाही” 

अखेर इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हाकलपट्टी!