“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

मुंबई | मुंबईसारख्या शहरातील लॉकडाऊन इतक्या लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. हे `बंद’ प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार आहे. परप्रांतीयांना बाहेर पडायची आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून घरी पोहोचायची घाई झाली आहे. अर्थात, त्यांना बाहेर पडू न देणे हे आरोग्याच्यादृष्टीने सोयीचे आहे, पण त्यांचे काफिले झुंडीच्या झुंडीने निघणारच असतील तर केंद्र सरकारला अशा लोकांची जबाबदारी झटकता येणार नाही, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून परप्रांतीय मजुरांची व्यथा मांडताना यावर उपाय करण्याचे केंद्र सरकारला सुचवलं आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक अडकले असून ते मजूर आणि कामगार आहेत. या नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत असल्याने ते आपल्या गावी जाऊ इच्छित आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे ते अडकून पडले असून जिथं आहे, तिथंच राहा, असं त्यांना सांगण्यात येत आहे. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपेल अशी आशा बाळगून मुंबईतील बांद्रा येथे हजारो परप्रांतीय मजूर एकत्र आले होते. या घटनेने देशभरात परप्रांतीय कामगारांचा मुद्दा समोर आला. आता, शिवसेनेनं सामनातून परप्रांतीयाबद्दल भूमिका मांडली आहे.

या नागरिकांची जबाबदारी झटकून चालणार नाही, असा सवालच सामनातून केंद्र सरकारला विचारण्यात आलाय. मात्र, त्यासोबत, भावांनो गावी जाऊन खाणार काय? असा प्रेमळ प्रश्नही या मजूरांना विचारला आहे.

दरम्यान, गाडय़ा सोडा, बसेस लावा, पण त्यांची जाण्याची व्यवस्था करा. कारण या मंडळींचा ‘होमसिक’नेस संपला नाही तर हे सर्व लोक रस्त्यावर उतरून काय हैदोस घालतील याचा नेम नाही. पुन्हा त्यांची डोकी भडकवून त्यावर राजकीय भाकऱया शेकणारे असंतुष्ट आत्मे आपल्या राज्यात काय कमी आहेत? त्यांना त्यांच्या राज्यात घेऊन चला, पण गडकरी म्हणतात त्या प्रश्नाचे उत्तरही शोधा. ‘भावांनो, गावी जाऊन खाणार काय? असेही अग्रलेखात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अभिनेत्री विद्या बालननं कोरोनाच्या लढ्यात केलेली मदत ऐकून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!

-3 मे नंतर लॉकडाऊन वाढणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

-महाराष्ट्र शासन कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे – गृहमंत्री

-वाधवान बंधूंना ‘ते’ पत्र देण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचं चौकशीत निष्पन्न- अनिल देशमुख

-3 मे नंतर लॉकडाउनचं काय?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…