फडणवीसांनी शिवरायांच्या महाराष्ट्रासोबत गद्दारी केली आहे- संजय राऊत

मुंबई:  विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 80 तासांसाठी मुख्यमंत्रिपद भूषवत महाराष्ट्राशी गद्दारी केली, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री होण्यामागे मोठा कट होता, त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा दावा भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला. हेगडे यांनी केलेल्या दाव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

अनंत कुमार हेगडे हे नेमकं काय बोलले हे मला माहित नाही. पण जे काही माध्यांकडून समजतंय त्यावरून अनंत हेगडे यांचा दावा शंभर टक्के खोटा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, अनंतकुमार हेगडे यांनी केलेले आरोप खरे असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल,  असं राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-