“राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडीच जिंकणार”

मुंबई | राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार. भाजपने उगाच आपले पैसे वाया घालवू नये. एखाद्या सामाजिक कार्यात वापरावं. सवय आणि चटक लावू नये. बाकी आम्ही समर्थ आहोत, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळानं भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र त्यांनी निवडणूक लढण्याचा निश्चय पक्का केलाय. अशावेळी कोणी कोणाला रोखू  शकत नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं.

गेल्या 50 वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. अशा निवडणुकांचा आम्हाला चांगला अनुभव आहे. फक्त आमच्या हातात ईडी नाही. पण बाकी इतर बऱ्याच गोष्टी सरकार म्हणून आमच्या हातात आहे, हे लक्षात घ्या, असाही इशारा संजय राऊतांनी विरोधकांना दिलाय.

तुम्ही आत्ताच का पत्ते पिसत आहात. बहुजन विकास आघाडी कुठे आहे? एमआयएम कुठे आहे? बच्चू कडू आणि आमदार कुठे आहे? हे 10 तारखेलाच कळेल, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला. भाजपनं तिसरा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही” 

’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य 

दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती! 

“मी जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल” 

करूणा शर्मांचा मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप, म्हणाल्या…