मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे एक षडयंत्र- संजय राऊत

मुंबई | सुशांत सिंहच्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश दिला आहे. याआधी हा तपास मुंबई पोलीस आणि ईडी करत होती. मात्र मुंबई पोलिसांकडून तपास काढून घेण्यात आला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सीबीआयकडे तपास सोपवणं म्हणजे मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे एक षडयंत्र केल्यासारखं आहे. कारण मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास केला असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात, देशभरात आहे. जर मुंबई पोलिसांना आपल्याच राज्यातील राजकारणी बदनाम करत असतील तर ते या राज्याचं खच्चीकरण करत आहेत. अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

दरम्यान,  महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. राज्याची एक मोठी परंपरा आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारं हे राज्य आहे. या राज्याने आतापर्यंत कोणाचाही अपमान केला नसल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरण सीबीआयकडे जाताच बॉलीवूड क्वीन कंगना रनौत म्हणतेय…

सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; भाजप नेत्या आणि शरद पवारांच्या नातवाची एकच प्रतिक्रिया!

महाराष्ट्र सरकारने सुशांतच्या प्रकरणावर आत्मचिंतन करण्याची गरज; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

चौकशीच्या घेऱ्यात सापडलेल्या रिया चक्रवर्तीला मोठा झटका!