“चंद्रकांत पाटील सज्जन, निरागस आहेत पण त्यांनी…”

नवी दिल्ली | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊतांनी चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत. निरागस आहेत. पण त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. डॉक्टर लहाने यांचं पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का हे पाहावं लागेल, अशी टीका त्यांनी केलीये.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत, निरागस आहेत. त्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय आहे काय? चीन आतमध्ये घुसत आहे. यावर भाजपनं बोलावं सीमेवर गंभीर परिस्थिती आहे, असं ते म्हणाले. तसेच कालच्या पंतप्रधानांच्या बैठकीला ज्यांच्याकडे सूत्र आहेत ते आरोग्यमंत्री उपस्थित होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, माझं आतापर्यंत काँग्रेस नेते वेणुगोपाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं. पण स्थानिक नेतृत्व जमिनीवर फक्त पाच बोटे चालत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केलीये.

संजय राऊतांनी गोव्याच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. गोव्यात काँग्रेसला सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न होते. गोव्याच्या वातावरणात कायम राजकारणाची नशा असते. ती अजून उतरलेली दिसत नाही, असंही ते यावेळी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या –

चालत्या बसमध्ये बस ड्रायव्हरला फीट आली, महिलेने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक 

पुरूषांसाठी अत्यंत महत्वाची माहिती; ‘या’ अवयवावर होतोय कोरोनाचा परिणाम 

“दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?, कृपा करून…” 

पेट्रोल-डिझेलसाठी आता मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत, वाचा आजचे ताजे दर 

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता