…तर गडांवर छ्मछम देखील होईल… हा शिवबांचा महाराष्ट्र नाही- शरद पवार

मुंबई |  गड किल्ल्यावर दारूची दुकाने थाटण्याची परवानगी सरकारने दिली. आता उद्या छ्मछमही आणतील. हा शिवबाचा महाराष्ट्र असूच शकत नाही. त्यामुळे शौर्याच्या आणि स्वाभिमानाच्या इतिहासाला धक्का लावणाऱ्या या सरकारला खाली खेचा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी केलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून गड किल्ल्यांवर हॉटेलवर-रिसॉर्ट उभारण्याची परवानगी देण्याबाबतचा सरकाराने अध्यादेश काढला होता. त्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली. 

शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यांवर इतिहास घडवला. त्या किल्ल्यांना राज्य सरकार हात लावणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.

ज्या किल्ल्यांना इतिहास नाही त्या किल्ल्यांसंदर्भात सरकार विचार करत आहे, असंही मुख्यमंत्र्यानी सांगितलं होतं.

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री सरकारने केलेल्या कामावर पाच मिनिटे बोलतात आणि बाकीचं भाषण फक्त शरद पवारांवर करतात. कारण त्यांना स्वप्नातही मीच दिसतो, असंही पवारांनी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या-