…तर मी देवेंद्र फडणवीसांना शाबासकी दिली असती- शरद पवार

पुणे | नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

फडणवीस यांचा चेहराच नाराज असल्याचे सांगत होता. लोकांमधून निवडून आले असते तर फडणवीसांना शाबासकी दिली असती. भाजपने एकनाथ शिंदे यांना मदत करण्याची जी भूमिका आत्ता घेतली ती अडीच वर्षांपूर्वी घेतली असती तर गेल्या अडीच वर्षात घडलं ते घडलंच नसतं, असं पवार म्हणाले.

भाजपकडून आदेश आला की तो सर्वोच्च आदेश असतो. मग दिल्लीवरून असो अथवा नागपूरहून- तो पाळावाच लागतो. त्यामुळे फडणवीसांना तो पाळावा लागला. त्यांच्यासाठी तो मोठा झटका होता, असं पवार म्हणाले.

नंबर दोनची जागा फडणवीसांनी आनंदाने स्वीकारली असं दिसत नाही. त्यांचा चेहरा सांगत होता, फडणवीस नाखुश होते. नागपूरमध्ये त्यांनी आरएसएसचे स्वयंसेवक म्हणून काम केलंय. तिथे जो आदेश येईल तो पाळावा लागतो. आरएसएसच्या संस्कारामुळे फडणवीसांनी हे स्वीकारलं, दुसरं काही कारण असू शकत नाही, असं पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे एखाद्यावर विश्वास टाकल्यावर त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी द्यायची, अशा स्वभावाचे आहेत. उद्धव ठाकरेंनी संघटनेची, विधिमंडळाची जबाबदारी पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर दिली होती, त्याचा हा परिणाम आहे, असं शरद पवार म्हणाले

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात सत्तांतर होताच शरद पवारांना धक्का 

“देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीच व्हायचं होतं तर…” 

अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे- शरद पवार 

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री 

“देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोठ्या मनाचा माणूस मिळणं कठीण”