“राहुल गांधीनी आधी स्वत:च्या आजीचा इतिहास सांगावा आणि मग सावरकरांवर बोलावं”

पुणे | ज्या व्यक्तीला आपल्या आजीचा इतिहास माहित नाही. त्यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय समजणार?, अशा शब्दांत अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीवर टीकास्त्र सोडलं आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आहे. त्यामुळे आता तरी सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळेलं, अशी अपेक्षा शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली आहे. धर्म गर्जना संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रभक्त सावरकर या विषयावर शरद पोंक्षे बोलत होते.

त्याच्या वक्तव्याला फारशी कोणी किंमत देत नाही. कारण ज्याला आपल्या आजीचा इतिहास माहित नाही त्याला सवरकरांचा इतिहास माहिती असण्याचं काही कारणच नाही, असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सचिन तेंडूलकरला भारतरत्न दिलेला चालतो मग वीर सावरकरांना का नाही?, असा सवाल शरद पोंक्षे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुंबई महापालिकेत शिवसेनेची जोरदार कोंडी करा; फडणवीसांनी नगरसेवकांना दिले आदेश

“चव्हाणांच्या दाव्याने खळखळ किंवा खळबळ होण्याचं कारण नाही”

-मंत्रालयानंतर सर्व शाळांमध्येही मराठी सक्ती, नवा कायदा तयार करण्याचे काम सुरु

-रेडमीच्या या फोनवर तब्बल तीन हजारांचा डिस्काऊंड! जाणून घ्या या जबरदस्त फोनचे फिचर्स…

-बदल्यावर बदल्या; तुकाराम मुंढेंची बदली नागपूर महापालिका आयुक्तपदी