औरंगाबाद | दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात, असं वादग्रस्त वक्तव्य वंचीत बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केलं आहे.
औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमासाठी सुजात आंबेडकर आले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितलं की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात, असं सुजात आंबेडकर म्हणाले.
ब्राह्मणांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलध्ये जे उतरतात, प्रत्यक्षात ते बहूजन मुलं असतात, असंही सुजाता आंबेडकर म्हणाले.
राज ठाकरेंना माझं एवढंच म्हणणं होतं की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहूजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावं, असं सुजात म्हणाले.
लोकांच्या भूकमारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असे सर्व आश्वासन देऊन भाजप सत्तेत आला. पण सत्तेत आल्यावर यावर कुणीही बोलायला तयार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणा साधलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार जणांना नोकरी
ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका देणारी बातमी समोर
“दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होता, आता हा…”
“अनिल देशमुख, आणि नवाब मलिक यांच्या कोठडीशेजारी सोमय्या राहणार”
“नारायण राणेंच्या उंचीएवढा दुसरा नेता कोकणात नाही”