“तुमची लायकी असेल तर एकदा मावळात येऊन उभे राहा म्हणजे…”

पुणे | नाशिकमध्ये झालेल्या कांदा परिषदेनंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. आता यावर भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी पडळकरांना जशास-तसं उत्तर दिलंय.

देशाच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांचं 50 वर्षाचं असलेलं योगदान संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कुठलही वक्तव्य केलं तर राज्यातील जनता ते स्विकारत होती. मात्र बाळासाहेब काय बोलले हे आज तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या व्यक्तीने बोलणं शोभणारं नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकरांनी आपली लायकी पाहून बोलावं, अशा शब्दांत सुनील शेळकेंनी पडळकरांनी सुनावलं आहे.

तुमची लायकी असेल तर एकदा मावळात येऊन उभे राहा म्हणजे तुम्हाला तुमची लायकी कळेल. पडळकरांसाख्या बेताल आणि जाबऱ्या बोलणाऱ्या व्यक्तिला आपण महत्व देऊ नये, असा घणाघात सुनील शेळके यांनी पडळकरांवर केलाय.

पडळकरांनी ज्यांना गुरु मानलं त्या देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आत्मचिंतन केल पाहिजे. त्यांनी त्यांच्या पिलावळांना समजून सांगितले पाहिजे. उगाच आपल्याला विधान परिषद दिली म्हणून आपण कुणावरी तोंड टाकायचं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं सुनील शेळके म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल”

पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान 

“शरद पवारांचं वय झालंय, त्यांनी आता घरी बसावं”

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाला नवं वळण; पुणे कनेक्शन समोर आल्याने खळबळ