मुंबई | अभिनेता सुशांत सिंह मृत्युच्या प्रकरणावरून बराच गदारोळ चालू आहे. बिहार पोलिस मुबंई पोलिसांकडे सुशांतच्या आत्महत्येचा तपास मागत आहेत. मात्र हा तपास मागून घेणं म्हणजे मुंबई पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखं आहे. मात्र अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने यासंदर्भात ट्विट केलं आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केली आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विट करताना ट्विटमध्ये सुशांतमध्ये #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅग वापरले आहेत.
दरम्यान, बिहारच्या येणाऱ्या निवडणूका यासाठी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच हे राजकीय षडयंत्र रचलं जात असून याचा निषेध करायला हवा, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled – I feel #Mumbai has lost humanity & is no more safe to live – for innocent, self respecting citizens #JusticeforSushantSingRajput #JusticeForDishaSalian
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 3, 2020
महत्वाच्या बातम्या-
चीनकडून युद्धाचे संकेत; सीमेलगत अण्वस्त्रवाहू विमाने, फायटर विमाने तसेच हजारो सैन्य तैनात
संतापजनक! तब्बल 10 शिक्षकांनी केला 13 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार
आत्महत्येपूर्वी सुशांत सतत सर्च करत होता ‘या’ तीन गोष्टी; मुंबई पोलिसांचा नवा खुलासा
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन
खुशखबर! आता घरीच करू शकाल कोरोनाची चाचणी अखेर भारताने बनवलं स्वस्तातलं टेस्टिंग किट!