गोपिनाथ मुंडेंवर झाले होते असेच आ.रोप; तेव्हा बाळासाहेब भर सभेत म्हणाले होते…

औरंगाबाद | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीतील सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बला.त्काराचा आ.रोप केला आहे. मुंडेंवरील या आ.रोपानंतर विरोधी पक्षातील नेते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

मात्र, धनंजय मुंडे यांनी या महिलेनं दाखल केलेल्या त.क्रारीचं खंडन केलं आहे. या संबंधीत त्यांनी फेसबुकवर एक भली मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. अशातच आता विरोधी पक्ष नेत्यांच्या सतत होणाऱ्या आ.रोपांनंतर शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.

अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वाक्याचा हवाला दिला आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर देखील असे आ.रोप झाले असताना बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते, याची आठवण सत्तार यांनी करून दिली आहे.

काल अब्दुल सत्तार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावर ब.लात्का.राचे आ.रोप झाले आहेत. काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडेंवर देखील असेच आ.रोप झाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, प्यार किया तो डरना क्या? बाळासाहेबांचे हे शब्द आजही मला आठवतात.

तसेच ज्या नेत्यांना अशाप्रकारची मुलंबाळं आहेत, त्या नेत्यांची नावं जाहीर करणं उचित होणार नाही. मात्र, भाजप नेते ज्यावेळी मला अशा नेत्यांची नावे द्यायला सांगतील तेव्हा मी या नेत्यांच्या नावांची यादीच देईल, प्रतिज्ञापत्रात अनेक भाजप नेत्यांनी आपली मुलबाळ लपवली आहेत, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

तसेच अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी आपलं प्रेम प्रकरण परस्पर संमतीने असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी याला हवा देण्याची गरज नाही. कोणाच्या वैयक्तिक जीवनावर बोलून राजकारण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा घटना देशभर घडत असतात.

हे सं.बं.ध दोघांच्या संमतीने झाले असल्यास काहीच हरकत नाही. मात्र, हे सं.बंध दोघांच्या संमतीवि.ना झाले असते तर मग याची चौकशी करण्याबाबतची मागणी आम्ही केली असती, असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या या गंभीर आ.रोपांमुळे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे. या घटनेचा मुंडे यांच्या राजकीय भवितव्यावर गंभीर परिणाम दिसून येईल, असं अनेकजण बोलत आहेत. याप्रकरणी पुढे काय होतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-