‘या’ बड्या अभिनेत्रीने पुन्हा उद्धव ठाकरेंवर केले धक्कादायक आरोप म्हणाली…

मुंबई | जेव्हापासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली तेव्हापासून कंगना आणि ठाकरे यांच्यातील शाब्दिक युद्ध संपन्याचं नावंच घेत नाही. कंगना रनौत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर सतत कोणत्या न कोणत्या गोष्टीवरून टीका करत असते. अलीकडेच उद्धव ठाकरे यांनीही कंगनाला ‘नमक हरामी’ असे तिचे नाव न घेता म्हटले आहे. मग पुन्हा कंगना रनौतनं ट्विट करुन मुख्यमंत्र्यावर हल्ला केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला कंगना रनौतनं जोरदार ट्विट करून प्रतिउत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री देशाला विभागन्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत त्यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कोणी बनवला? ते महाराष्ट्र स्वतःच्या मालकीचा असल्यासारखं का वागतात? असा सवाल तिनं मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात आपल्या भाषणातून कंगनावर जोरदार निशाणा साधला होता. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि ‘नमक हरामी’ करायची अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कंगनावर निशाणा साधला होता. यालाच ट्विटच्या माध्यमातून कंगनाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे लोकसेवक असूनही अगदी शुल्लक गोष्टींवरून संघर्ष करत आहात. तुमच्याजवळ असलेली सत्ता तुम्ही तुमच्या मतांशी सहमत नसलेल्या लोकांचा अपमान करण्यासाठी वापरत आहात.  घाणेरडे राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही, असं कंगनानं म्हटलं आहे.

यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट केले आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. ज्याप्रमाणे हिमालयातील सौंदर्य प्रत्येक भारतियाचे आहे. त्याचप्रमाणे मुंबई आपल्या सर्वांना संधी देते. हे दोन्ही माझे घर आहेत, असंही तिनं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे आमचे लोकशाही हक्क आमच्याकडून काढून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, अशा शब्दात तिनं मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

कंगना यावरच थांबली नसून तिने अजून एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे. ते फक्त जनतेचे सेवक आहेत त्यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कोणी बनवला. ते महाराष्ट्र स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे का वागतात? असा प्रश्‍न कंगनाने विचारला आहे.

कंगना पुढे म्हणते की, तुम्ही एका अविवाहीत स्त्रिशी बोलताय जरा विचार करून बोला. मुख्यमंत्री तुम्ही नेपोटिझमचे सर्वात वाईट उत्पादन आहात. मला तुमच्यासारखं व्हायच नाही तसं असतं तर मी हिमाचल मध्येच राहिले असते. मी एका श्रीमंत कुटुंबातून आलेली आहे मी त्यांंच्या संपत्तीवर जगू शकत नाही. मला  माझा स्वाभिमान आहे आणि त्याची किंमत पण आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

करीनानं शेअर केला एक्स बॉयफ्रेंड शाहीद कपूरचा फोटो! नक्की कनेक्शन काय आहे?

खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार का? भाजप कार्यालयातील ‘त्या’ घटनेनं अनेकजन गोंधळात!

धक्कादायक! मुंबईत ‘या’ बड्या अभिनेत्रीवर चाकूने ह.ल्ला

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अन् शेवट भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या ‘या’ माजी आमदाराचं नि.धन

पुण्यातील लाॅजवर पोलिसांनी टाकला छापा, आत सुरु असलेला प्रकार पाहून पोलीसही हैराण!