फिरायला आलेल्या तरुणीवर तीन मित्रांचा बलात्कार, अत्यंत धक्कादायक घटना

मुंबई | सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये मशगुल असताना एक वाईट घटना राज्यात घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी अत्याचाराची घटना घडल्यानं महाराष्ट्र हादरला आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अंबरनाथ येथे हत्येची घटना घडली होती. त्यानंतर आता याच ठिकाणी एक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. परिणामी सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अंबरनाथ येथील एमआयडीसी भागात बलात्काराची घटना घडली आहे. तीन मित्रांनीच आपल्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याची अत्यंत धकादायक घटना घडली आहे.

अंबरनाथ येथील अतिरिक्त औद्योगिक परिसरात असणाऱ्या जीआयपी धरणाच्या आसपास ही वाईट घटना घडली आहे. या घटनेची अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

अंबरनाथ परिसरात असणाऱ्या रेल्वेच्या ग्रेट इंडीयन पेनिनसुला धरणाच्या परिसरात ही तरुणी तीन मित्रांबरोबर फिरायला गेली होती. आपल्या मित्रांसोबत फिरत असताना तिला असं काही घडेल याची कल्पना सुद्धा नव्हती.

त्या तीन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरूणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. परिणामी सध्या अंबरनाथमध्ये तणावपुर्ण शांतता आहे.

अटक करण्यात आलेले तीनही आरोपी हे 25-30 वयोगटातील आहेत. सध्या या प्रकरणात अधिक तपास करण्यात येत आहे. परिणामी पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं नुकताच महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचा आणि कठोर असा दिक्षा कायदा मंजूर केला आहे. तरही अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत विकृत मानसिकतेला लवकर आळा घालण्याची गरज भासत आहे.

महत्वाच्या बातम्या –

 मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!

 कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

 …म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ

अभिजित बिचुकले ‘या’ अभिनेत्रीला भिडला; बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार

प्रवीण दरेकरांचा करिश्मा, ‘ही’ निवडणूक एकहाती जिंकली!