“तुम्हाला कर्जमाफीवर बोलण्याचा अधिकार नाहीये… तुम्ही शेतकऱ्यांना फसवून खेट्या मारायला लावल्या”

मुंबई | ठाकरे सरकारने सत्तेत येताच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीच्या अंमलबजावणीचं कामही सुरू झालं आहे. मात्र विरोधकांनी महाविकास आघाडीच्या शेतकरी कर्जमाफीवर जोरदार आसूड ओढले आहेत. भाजप नेत्यांच्या टीकेला काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मागच्या भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांच्या आणि बँकेच्या खेट्या माराव्या लागत असे. त्यामुळे मागच्या सरकारला शेतकरी कर्जमाफीवर बोलण्याचा अधिकार नसून, त्यांनी पाच वर्षे फक्त कर्जमाफीचा गाजावाजा केला . आज फक्त एका आंगठा देऊन शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेत आहे, असं प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना दिलं आहे.

काल राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावं आहेत. ३४,८३,९०८ खात्यांची माहिती संकलित करण्यात आली आहेत. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्रं दिलं जात आहे. अंगठ्याचा ठसा देताच शेतकऱ्यांना कर्ज वितरीत केलं जात आहे, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

एकवचनी स्वत:ला म्हणणारे आता बहुवचनी म्हणवून घेत आहे. 2 लाखापर्यंत घेतलेलं कुठल्याही कामासाठी कर्ज माफ होईल, असं आम्हाला वाटलं… पण हे सरकार म्हणतंय ट्रॅक्टर, गाय, बैल यासाठी घेतलेलं कर्ज माफ होणार नाही फक्त पीकासाठी घेतलेलं कर्ज माफ होईल. या खोटं बोलणाऱ्या पापी सरकारला एकही दिवस सत्तेत बसण्याचा अधिकार नाहीये, अशी जहरी टीका शेलार यांनी केली महाविकास आघाडीवर केली आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

…तर उद्धवजी अन् अजितदादा, शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- फडणवीस

-सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढलाय; आशिष शेलारांची जहरी टीका

-इंदोरीकर महाराजांना दिलासा; सायबर सेलचा मोठा खुलासा

“अजित पवारांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली; निवडणुकीत तब्बल 50 कोटी वाटले”