महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचे पडसाद दिल्लीत; युवक काँग्रेसचं संसद परिसरात आंदोलन

मुंबई | महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचे पडसाद आता राजधानी नवी दिल्लीत उमटले आहेत. दिल्ली युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी तर अजित पवार  यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या निषेधार्थ आज नवी दिल्लीतजोरदार निदर्शनं करण्यात आली.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा दाखल झालेला आहे. तसंच काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुन्हा आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केलाय.

दुसरीकडे राज्यातील सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसदेच्या आवारात सरकारविरोधी निषेध मोर्चा काढण्यात आला. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी हातात फलक घेऊन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.

दरम्यान, मला संसदेत काही प्रश्न विचारायचे आहेत. मात्र त्याला काही अर्थ नाहीेये. कारण महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झालीये, असं राहुल गांधींनी म्हटलं. लोकसभेचं कामकाज सुरू होताच, बंद करा… बंद करा…. संविधानाची हत्या बंद करा, अशा घोषणा विरोधी पक्षाने दिल्या.

 

महत्त्वाच्या बातम्या-