Manoj Jarange Patil | राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत उपोषण करत आहेत. तर यासोबतच जरांगे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना जालन्यातून लोकसभा निवडणुकीची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, जरांगेंनी राजकारणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
राजकारणाबदल जरांगेंची प्रतिक्रिया-
गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. या बरोबरच जरांगे (Manoj Jarange Patil) राजकारणात येणार असल्याच्या देखील चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकरांनी जरांगेंना ऑफर देखील दिली होती. दरम्यान जरांगेंनी राजकारणाबाबत आपली स्पष्ट भूमीका मांडली.
राजकारण हा माझा मार्ग नाही-
माध्यामांशी बोलत असताना जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, “सध्या माझं पूर्ण लक्ष हे मराठा आरक्षणावर आहे. राजकारण हा माझा मार्ग नाही. मराठ्यांची लेकरं मोठी व्हावी, यासाठी माझी झुंज चालू आहे. माझ्यासाठी समाज हा सर्वात मोठा आहे.
पुढे जरांगे म्हणाले की, “मी माझ्या समाजासाठी काम करत राहीन, लढत राहीन.” दरम्यान, मनोज जरांगे यांनी यावेळी जाहीर केलं की, ते आणि त्यांचे सहकारी 3 मार्चपासून साखळी उपोषण करतील. पाटील यांनी 3 मार्च रोजी राज्यभर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. परंतु, आता त्यांनी परिक्षांमुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
माझा फोकस फक्त आरक्षणावर-
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभेचं तिकिट देण्याबाबत मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी प्रकाश आंबेडकर यांचा कसा शब्द टाळू, तरीही माझा फोकस फक्त आरक्षणावर आहे. पुढे ते म्हणाले की, “माझा लढा हा राजकीय लढा नाही तर माझा समाजिक लढा आहे. मी माझ्या समाजाविरोधात जाणार नाही”.
News Title : manoj jarange patil speaks about political entry
महत्त्वाच्या बातम्या-
1 मार्चपासून नियमांत मोठे बदल होणार; नागरिकांच्या खिशावर होणार थेट परिणाम
मार्चमध्ये लाँग वीकेंडच नियोजन करताय तर या ठिकाणांना भेट द्या!
“…त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही”, मनोज जरांगेंनी केलं मोठं विधान!
मोठी बातमी! मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे, अखेर….
या महिला क्रिकेटरने चक्क मुंबई इंडियन्सला चारली पराभवाची धूळ